मुंबई: एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या बसेस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात चालकांवर नजर ठेवणारे कॅमेरे असतील. हे कॅमेरे चालकांच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवणार आहेत. गाडी चालवत असताना चालक जर अपघात होण्यास कारणीभूत होईल अशी कृती करत असेल तर (उदा. झोप लागणे, डुलकी घेणे, जांभई देणे) मोबाईल वापरणे असली तरी हे कॅमेरे अलार्म वाजवतील असे म्हटले जात आहे.
एसटी महामंडळ एकूण पाच हजार बसेस विकत घेणार आहे. त्यातील किमान एक हजार बसेस या ई-बसेस असणार आहेत. या बसेस टप्प्या टप्प्याने एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत.
पुण्यामध्ये आज स्मार्ट ई-बसेसच सादरीकरण झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या ई-बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात,एसटी महामंडळात दाखल होणाऱ्या ई-बसेस एआय तंत्रज्ञानावर आधारित आणि एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही दिल्या होत्या असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.त्यानुसार आज उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे आज सादरीकरण करण्यात आले.
नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे एआय तंत्रज्ञानावर आधारित CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभई देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल, अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई-बसेस मध्ये असणार आहे. तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
आणखी काय उपाययोजना ?
बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्नीशामक यंत्रणा बसमध्ये असावी असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
Category Archives: महाराष्ट्र
Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे पूर्णतः विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी ते पनवेल दरम्यान अप आणि डाउन लोकलसेवा थांबवण्यात आली आहे. नेरुळ स्थानकातही गाड्या थांबवल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितलंय. बेलापूर ते सीवूड्स स्थानकादरम्यान अनेक गाड्या थांबवण्यात आल्या असून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
कामाच्या वेळेत अचानक लोकलसेवा सेवा बंद झाल्याने स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. काही ठिकाणी प्रवाशांनी संतापही व्यक्त केलाय. रेल्वेकडून तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अद्याप हार्बरची लोकलसेवा सुरू झालेली नाही.
![]()
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुटणाऱ्या कोयना व महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वेला गांधीनगर, रुकडी व ताकारी येथे थांबे देण्याचा मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.मध्य रेल्वेची १२६ वी क्षेत्रीय सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे मध्य रेल्वे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ही निर्णय घेण्यात आला. सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी यांनी ही माहिती दिली.कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस व हुबळी-पुणे वंदे भारतला कराड येथे थांबा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्याच वेळी येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी कोल्हापूरहून पंढरपूरला विशेष गाड्या सोडणार असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेसचा विशेष दर्जा काढून सर्वसाधारण आकारणी करण्याचे ठरले.सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यासंबंधी प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी लवकर सोडण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.सांगली-परळी एक्स्प्रेस सध्या डेमू धावतो, त्याऐवजी आयसीएफ कोचने सोडण्याचा मागणीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. यावेळी मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, किशोर भोरावत, गोपाळ तिवारी व गजाधर मानधना उपस्थित होते
मुंबई:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावची सुकन्या कु श्रृती शामसुंदर राऊळ हिला झी मराठी च्या “चल भावा सिटीत “या रिअॅलिटी शोमध्ये अंतिम सोहळ्यात विजेतेपद मिळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश चव्हाण या तिच्या सहकाऱ्यासह तिने हे यश मिळवले आहे. या यशने कुमारी श्रुतीने शिवापूर च्या इतिहासात कला क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे.
“चल भावा सिटीत” या रिअॅलिटी शोमध्ये गेली तीन महिने श्रृती शामसुंदर राऊळ ही यशस्वी टास्क करत होती. अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या होत्या. श्रृती राऊळ ने चल भावा सिटीत” या कार्यक्रमात अभिनेता श्रेयश तळपदे यांच्या अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या. यात तिला वडील शामसुंदर राऊळ, आई लता राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले. श्रृती च्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. श्रृती हिने या पूर्वी गोवा सुंदरी विजेती ठरली होती.
मुंबई, दि. २२ :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण राज्यभरातील आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, महानगरपालिका नियंत्रण कक्ष आणि रेल्वे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी जाहीर केले आहेत.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय, मुंबई
आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9321587143,
दूरध्वनी: 022- 220227990, 022- 22794229, 022- 22023039,
आपत्कालीन संपर्क – 1070
ई-मेल [email protected]
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक :-
- मुंबई शहर- ०२२-२२६६४२३२,
- मुंबई उपनगर- ०२२-६९४०३३४४,
- ठाणे – ०२२-२५३०१७४० /९३७२३३८८२७,
- पालघर – ०२५२५-२९७४७४/ ०२५२५-२५२०२०,
- रायगड – ०२१४१-२२२०९७,
- रत्नागिरी – ०२३५२-२२२२३३ / २२६२४८,
- सिंधुदुर्ग- ०२३६२-२२८८४७,
- नाशिक – ०२५३-२३१७१५१,
- अहिल्यानगर – ०२४१-२३२३८४४,
- धुळे- ०२५६२-२८८०६६,
- नंदुरबार – ०२५६४-२१०००६,
- जळगाव – ०२५७-२२१७१९३/२२२३१८०,
- पुणे – ०२०-२६१२३३७१,
- सोलापूर – ०२१७-२७३१०१२,
- कोल्हापूर – ०२३१-२६५२९५४,
- सांगली – ०२३३-२६००५००,
- सातारा- ०२१६२-२३२३४९/२३२१७५,
- छत्रपती संभाजीनगर- ०२४०-२३३१०७७,
- धाराशिव- ०२४७२-२२७३०१,
- हिंगोली – ०२४५६-२२२५६०,
- परभणी – ०२४५२-२२६४००,
- बीड- ०२४४२-२९९२९९,
- नांदेड – ०२४६२-२३५०७७,
- जालना- ०२४८२-२२३१३२,
- लातूर- ०२३८२-२२०२०४,
- अमरावती- ०७२१-२६६२०२५,
- यवतमाळ – ०७२३२-२४०७२०,
- वाशिम- ०७२५२-२३४२३८,
- अकोला- ०७२४-२४२४४४४,
- बुलढाणा- ०७२६२-२४२६८३,
- नागपूर – ०७१२-२५६२६६८,
- वर्धा- ०७१५२- २४३४४६/२९९०१०,
- चंद्रपूर – ०७१७२- २७२४८०/२५००७७,
- गोंदिया – ०७१८२- २३०१९६,
- भंडारा- ०७१८४- २५१२२२,
- गडचिरोली- ०७१३२- २२२०३१/२२२०३५
महानगरपालिका नियंत्रण कक्ष क्रमांक
- बृहन्मुंबई – ०२२-२२६९४७२५/२७, २२७०४४०३/१९१६/९८३३८०६४०९,
- ठाणे – ०२२-२५३७१०१०/८६५७८८७१०१/ ०२/ ७५०६९४६१५५,
- नवी मुंबई – ०२२-२७५६७२८१,
- भिवंडी – ०२५२२-२५००४९/२३२३९८,
- कल्याण – ०२५१-२२११३७३,
- मीरा भाईंदर- ०२२-२८१९२८२८/२८११७१०२,
- उल्हासनगर – ०२५१-२७२०१४९/२७२०१४३,
- वसई-विरार – ०२५०-२३३४५४७,
- पनवेल – ०२२-२७४५८०४०,
- नाशिक – ०२५३-२५७१८७२/२३१७५०५,
- मालेगाव – ०२५५४- २३४५६७,
- अहिल्यानगर-०२४१- २३२९५८१/०२४१- २३२३३७०,
- धुळे- ०२५६२-२८८३२०,
- जळगाव – ०२५७-२२३७६६६,
- पुणे- ०२०-२५५०६८००/१/२/३,
- पिंपरी-चिंचवड – ०२०-६७३३११११,
- सोलापूर – ०२१७-२७४०३३५,
- कोल्हापूर- ०२३१-२५३७२२१,
- सांगली-मिरज-कुपवाड – ०२३३-२९५०१६१,
- छत्रपती संभाजीनगर – ०२४०-१५५३०४,
- परभणी – ०२४५२-२२३१०१,
- नांदेड- ०२४६२-२३४४६१,
- लातूर- ०२३८२-२४६०७७/२४६०७५,
- अमरावती – ०७२१-२५७६४२६,
- अकोला – ०७२४-२४३४४६०,
- नागपूर – ०७१२-२५५१८६६/७०३०९७२२००,
- चंद्रपूर – ९८२३१०७१०१ / ८९७५९९४२७७, ०७१७२-२५९४०६/२५४६१४
रेल्वे नियंत्रण कक्ष समन्वय अधिकारी
- कोकण रेल्वे- बेलापूर हेड क्वाटर कंट्रोल रूम- ९००४४४७१९९
- पश्चिम रेल्वे- डेप्युटी पंक्च्युयालिटी – ९००४४९९०९९
- मध्य रेल्वे- सेफ्टी काऊंसिलर आपत्ती व्यवस्थापन- ८८२८११००५०
#ZeeCineAwards2026Sindhudurg pic.twitter.com/ZDgvLBvOxD
— Nitesh Rane (@NiteshNRane) May 17, 2025











