Category Archives: मुंबई

मुंबई लोकल्स समोरा समोर आल्याची ‘ती’ बातमी खोटी

   Follow us on        

Mumbai Local: मिरा रोड रेल्वे स्थानकावर एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर आल्याची धक्कादायक बातमी आज समाज माध्यमांवर आज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मोठा अपघात थोडक्यात टळला अशा या शीर्षकाखाली न्यूज चॅनेल्सने सुद्धा या बातमीचा मोठा गाजावाजा केला होता. मात्र ही बातमी खोटी असल्याचा खुलासा पाश्चिम रेल्वेने केला आहे.

“सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे. मीरा रोड स्थानकावर एकाच रुळावर गाड्या जवळपास समोरासमोर आल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. आज 17.00 वाजता, एक लोकल ट्रेन पुरेशा आणि सुरक्षित अंतर राखून त्याच ट्रॅकवर दुसऱ्याच्या मागे उभी होती. हे ऑपरेशनल नियमांनुसार होते. उपनगरीय ट्रेन ऑपरेशन नियमानुसार, जर सिग्नल दिवसा 1 मिनिटांपेक्षा जास्त काळ लाल असेल (आणि रात्री 2 मिनिटे) तर EMU ट्रेन मर्यादित वेगाने पुढे जाऊ शकते आणि पुढील ट्रेनच्या जवळ येऊ शकते.सुरक्षा प्रोटोकॉलनुसार हे पूर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अफवा पसरवणे आणि दहशत पसरवणे थांबवावे.” अशा शब्दात पाश्चिम रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

   Follow us on        

 

 

 

समोर वाकलेला रूळ… मोटारमेनचे प्रसंगावधान; लोकल ट्रेनचा मोठा अपघात होता होता टळला

   Follow us on        

Mumbai: विरारहून मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लाईनच्या अप मार्गावर काल मंगळवारी रेल्वे रुळ वाकल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे विरार चर्चगेट एसी ट्रेनचा जागच्या जागी ब्रेक मारल्यानं वेस्टर्न लाईनवर मोठा अनर्थ टळलाय. ट्रेनचा मोटरमन रुळावर लक्ष ठेवून होता आणि त्याला वाकलेला ट्रॅक दिसताच त्याने गाडी थांबवली. पुढील दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित कळवले. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. परंतू ट्रॅक नक्की कशामुळे वाकला? याचे नेमके कारण स्पष्ट होऊ न शकल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

मंगळवारी दुपारी 12.45 ला विरारहून सुटलेली एसी लोकल विरार-नालासोपारा स्थानकादरम्यान आली असता मोटरमनच्या लक्षात वाकलेला रेल्वे रुळ आला. त्याने तत्काळ लोकल थांबवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर मागून येणाऱ्या जनरल लोकललाही थांबवण्यात आले. दोन्ही लोकल थांबल्याने अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरून पायी नालासोपारा स्थानक गाठले. रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत फास्ट ट्रॅकवरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वाकलेला रुळ पूर्णपणे बदलला, त्यानंतर फास्ट लाईनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, ट्रॅक वाकण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

या घटनेमुळे प्रवाशांना काही काळ गैरसोय सहन करावी लागली. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप राहिले. त्याच्या वेगवान निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवाशांनी मोटरमनचे आभार मानले असून, त्यांच्या सतर्कतेची प्रशंसा केली आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, ट्रॅक वाकण्याचे कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी रेल्वे ट्रॅकच्या देखभालीवर अधिक भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. मोटरमनच्या निर्णयामुळे एका मोठ्या दुर्घटनेची टांगती तलवार टळली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाकडून अधिक मजबूत सुरक्षा उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

३१ डिसेंबरला ‘पेग लिमिट’ चा नियम; जास्तीत जास्त किती पेग घेता येणार?

   Follow us on        
मुंबई: नवं वर्ष सुरू होण्यासाठी अगदी मोजकेच दिवस शिल्लक आहेत, मात्र आतापासूनच अनेकांनी नववर्षाच्या स्वागताचं नियोजन करण्यास सुरुवात केले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी  मात्र मस्त हॉटेलमध्ये जाऊन दारूचे ग्लास रिचवत नवं वर्षाचं सेलिब्रेशन करण्याच्या बेतात असलेल्या एक महत्वाची बातमी  आहे. नव्या नियमांनुसार नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जे हॉटेल किंवा बारमध्ये 31 डिसेंबरला जाणार आहेत, अशा मद्यपींना केवळ चार पेग एवढीच दारू मिळणार आहे.
चार पेगपेक्षा अधिक दारू यावेळी कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही. याबाबत हॉटेल असोसिएशनकडून माहिती देण्यात आली आहे. नव्या वर्षाचं सेलीब्रेशन करण्यासाठी अनेक जण हॉटेलमध्ये येतात. ते प्रमाणाबाहेर दारू पितात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होतो. प्रमाणाबाहेर दारू पिल्यास अपघाताचा धोका असतो. जेव्हा लोक दारू पिऊन आपल्या गाडीनं घरी जातात तेव्हा अनेक अपघात होतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या वर्षी नव वर्षाच्या स्वागताला हा नियम बनवण्यात आल्याचं हॉटेल असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे.
चालकाची व्यवस्था करणार
सरकारकडून नव वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व हॉटेल आणि बारसाठी नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे. कोणत्याही ग्राहकाला दारू देण्यापूर्वी त्याच्या वयाबाबत खात्री करून घ्यावी. त्याच्या वयाचा पुरावा त्याच्याकडे मागावा. अल्पवयीन असेल तर दारू देऊ नये. तसेच दारू पिल्यामुळे जर त्याला घरी जाण्यास समस्या असेल तर अशा व्यक्तींसाठी चालकाची सोय करावी. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला सकाळी पाच वाजेपर्यंत सर्व हॉटेल आणि बार सुरू राहणार आहेत, तशी परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासोबतच हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांना दारूच्या लिमीटचं बंधन देखील घालण्यात आलं आहे.

मुंबई आणि ठाण्यात लवकरच दिसणार केबल टॅक्सी

   Follow us on        

मुंबई: रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जबरदस्त प्लान बनवत आहेत. मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात रस्ते वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी एमएमआर क्षेत्रात भविष्यात केबल टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. केबल टॅक्सी प्रकल्प हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सध्या युरोपियन देशांमध्ये केबल टॅक्सी सेवा सुरू आहे. बंगळुरूतील रोप वे वाहतुकीचा अभ्यास करुन अहवाल तयार केला जाणार आहे. याच्या मदतीनेच मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी कुठेच सुरु नाही. केबल बोर्न टॅक्सी ही रोप वे प्रमाणे काम करेल. यामध्ये एका वेळी 15-20 प्रवाशांची वाहतूक करता येईल. हा प्रकल्प मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए) च्या अंतर्गत नसून राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या अंतर्गत असेल असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आपण मेट्रो चालवू शकलो तर केबल टॅक्सी चालवायला काहीच हरकत नाही, कारण रोप वे बांधण्यासाठी आपल्याला जास्त जमीन लागणार नाही असेही असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

सरनाईक यांच्या आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही केबल टॅक्सी हे वाहतुकीचे उत्तम साधन असल्याचे सांगितले होते. केबल टॅक्सी पॉड टॅक्सी म्हणूनही ओळखली जाते. केबल टॅक्सी वीज आणि सोलर एनर्जीवर चालते. हे वाहतुकीचे अतिशय पर्यावरणपूरक साधन आहे.

 

 

 

मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ठाण्यावरून कल्याणला वळवली.. कारण काय?

   Follow us on        

मुंबई: आजची मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे ठाणे ते पनवेल दरम्यान तिच्या नियमित मार्गावरून वळविण्यात आली. या कारणाने पुढे तिचा गोव्याला जाणारा प्रवास ९० मिनिटे उशिराने झाला.

कोकणात जाणारी ही गाडी दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर पनवेल स्थानकाकडे जाण्याऐवजी सकाळी ६:१० वाजता कल्याण मार्गावरून निघाली.

या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील मुंबई लोकल सेवेवरही परिमाण झाला आणि या दरम्यानच्या लोकल गाड्यांनी लेटमार्क लावला.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, दिवा जंक्शनवरील कोकणात जाणार्‍या गाड्यांचा मार्गावर म्हणजे डाऊन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक १०३ वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली.

ट्रेनने नियोजित मार्गावरून मार्ग बदलल्यानंतर, ती कल्याण स्टेशनला रवाना झाली आणि दिवा जंक्शनवर परत फिरविण्यात आली आणि दिवा-पनवेल मार्गावर मडगावकडे परत प्रवास सुरू केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नीला म्हणाले की, सकाळी ६:१० ते ६:४५ पर्यंत कल्याणकडे जाण्यापूर्वी ही गाडी दिवा जंक्शनवर सुमारे ३५ मिनिटे थांबली होती.

जून २०२३ मध्ये सुरू झालेली प्रीमियम सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबईतील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून सकाळी ५:२५ वाजता निघते आणि त्याच दिवशी दुपारी १:१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचते.

 

 

 

 

दाट धुक्यांमुळे गाड्यांचा ‘लेटमार्क’

   Follow us on        
Central Railway:घाटमाथ्यावर पडणाऱ्या दाट धुक्याचा परिणाम आता उपनगरीय रेल्वे गाड्या आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांवर होत आहे. गर्द धुक्यांमुळे कर्जत, कसारा, खोपोलीहून सुटणाऱ्या लोकल आणि लोणावळा-खंडाळा, इगतपूरी कर्जत, खोपोलीहून सुटणाऱ्या लोकलचा वेग मंदावला असून या मार्गावरील मेल-एक्स्प्रेस अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. शनिवारी सकाळच्या सत्रातील रेल्वे सुमारे अर्धा तास विलंबाने धावत होत्या
यंदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच दाट धुके रुळांवर आले आहे.कर्जत, कसारा, खोपोली आणि लोणावळा-खंडाळा घाटामार्गावरील रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात धुके आल्याने प्रवासी सुरक्षेसाठी वेगमर्यादा  लागू करण्यात आली आहे. सध्या नियोजित वेगापेक्षा कमी वेगाने रेल्वे गाड्या धावत आहेत. देशभरातून इगतपुरी आणि लोणावळा-खंडाळा घाटात ये-जा करणाऱ्या सकाळच्या सत्रातील सर्वच रेल्वे गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे रेल्वे गाळ्या सुमारे २५ ते ३० मिनिटे विलंबाने धावत आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रुळांवरील गस्त वाढली
कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे रुळांचे प्रसरण होऊन त्यांना तडा जाण्याच्या घटना घडतात. अशा घटना रोखण्यासाठी रुळांवरील गस्त वाढवण्यात आली आहे. रुळ सामान्य स्थितीत न आढळल्यास ब्लॉक घेऊन रुळांची देखभाल केली जाते. अद्याप थंडीमुळे रुळांला तडा गेल्याची कोणतीही घटनेची नोंद झालेली नाही. त्याचबरोबर दाट धुक्यांमुळे उपनगरी रेल्वे फेच्या रद्द करण्यात आलेल्या नाहीत. सद्यस्थितीत कल्याण ते कसारा आणि कल्याण ते खोपोलीसह लोणावळा, संकी हिल, नागनाथ, ठाकूरवाडी, इगतपुरी येथील संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Mumbai Local: मुंबई लोकलच्या १३ एसी फेऱ्या वाढल्या

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांना वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने २७ नोव्हेंबरपासून १३ अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९ वर पोहोचली आहे.
पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे जादा लोकल फेऱ्या चालवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. या मागणीचा विचार करून नुकतीच एक १२ डब्यांची वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. आता काही सामान्य लोकल फेऱ्यांऐवजी नवीन वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. १३ वातानुकूलित लोकल फेऱ्यांपैकी ६ अप आणि ७ डाऊन दिशेने धावतील. यामध्ये १० जलद आणि ३ धीम्या लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. विरार-चर्चगेट, भाईंदर-चर्चगेटदरम्यान दोन लोकल फेऱ्या, विरार-वांद्रे, भाईंदर-अंधेरीदरम्यान प्रत्येकी एक फेरी, चर्चगेट-विरार दरम्यान दोन लोकल फेऱ्या, अंधेरी-विरार, वांद्रे-भाईंदर, महालक्ष्मी-बोरिवली आणि बोरिवली-भाईंदरदरम्यान प्रत्येकी एक लोकल फेरी धावेल. पश्चिम रेल्वेवर आता १०९ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतील. तर, शनिवार-रविवारी ५२ ऐवजी ६५ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Mumbai Local: ट्रेनमध्ये सीटवरून झालेल्या भांडणात एकाचा खून

   Follow us on        

Mumbai Local: मुंबई लोकल मध्ये शुल्लक कारणाने झालेल्या भांडणांमुळे एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असल्याची घटना घाटकोपर येथे घडली. 15 नोव्हेंबर रोजी घाटकोपर (Ghatkopar) स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये सीटवरून झालेल्या भांडणात एका मुलाने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहवालानुसार, टिटवाळ्यातील या 16 वर्षीय मुलाने 35 वर्षीय व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. खुनाच्या एक दिवस अगोदर मयत अंकुश भालेराव आणि त्याच्या साथीदारांचा ट्रेनमध्ये प्रवास करताना या मुलासोबत जोरदार वाद झाला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी हा मुलगा चाकू घेऊन गेला आणि त्याने कामावर जात असलेल्या भालेराव यांच्यावर हल्ला केला.

गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) अखेर स्टेशनवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा माग काढला आणि खुनाच्या दोन दिवसांनंतर टिटवाळा येथून त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोठा भाऊ मोहम्मद सनाउल्ला बैथा (25) याला गोवंडी येथून अटक केली. त्याने आपल्या भावाला चाकू लपवण्यात आणि पकडण्यापासून वाचवण्यात मदत केल्याचा आरोप आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत दोघेही टिटवाळा येथील रहिवासी आहेत. 14 नोव्हेंबरला ट्रेनमधील चौथ्या सीटवरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. बेनाली गावातील रहिवासी भालेराव आणि त्यांच्या इतर दोन मित्रांनी भांडणाच्या वेळी या अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यानंतर मुलाने भालेराव यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी आरोपी टिटवाळ्याहून ट्रेनमध्ये चढला आणि घाटकोपर स्टेशनवर उतरला. तो भालेराव येण्याची वाट पाहू लागला.

सकाळी दहाच्या सुमारास भालेराव खाली उतरले आणि ते आपल्या कामावर जाऊ लागले. त्याचवेळी आरोपीने गुपचूप त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर पाठीमागून वार करून पळ काढला. त्यानंतर भालेराव यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये त्याने पोलिसांना आरोपीने दिलेल्या धमकीबद्दल सांगितले. ट्रेनमध्ये जेव्हा भांडण झाले होते तेव्हा भालेराव यांनी आरोपीचा फोटो काढला होता.

रायझिंग सन क्रीडा उत्सव मंडळ आयोजित वार्षिक उत्सव जल्लोषात संपन्न

   Follow us on        

मुंबई:- रायझिंग सन क्रीडा उत्सव मंडळ (रजि.) चारकोप सेक्टर एक यांच्या वतीने आयोजित केलेल्या वार्षिक उत्सवात क्रिकेट, होम मिनिस्टर, वेश भूषा, चित्रकला, पाक कला स्पर्धा, कोजागिरी, रास गरबा – दांडिया तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम आर.एस.सी. १५ मधील बाळ-गोपाळ, बंधू – भगिनी व रहिवाश्यांनी जल्लोषात व उत्साहात साजरा केला. उत्सवा दरम्यान रस्ता क्रमांक १५ विद्युत रोषणाईने झगमगला होता.

क्रिकेट स्पर्धेच्या अटीतटीच्या लढतीत साईकुंज संस्थेनेच्या महिला व पुरुष या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ करत विजेते पद पटकविले. या स्पर्धेचे अप्रतिम नियोजन केतन धाटावकर व गिरीश दहीबावकर यांनी केले होते.

महिलांचा आवडता कार्यक्रम “होम मिनिस्टर” म्हणजेच खेळ पैठणीचा पाऊस असूनही खूपच रंगतदार ठरला. आपल्या खास शैलीत निवेदक प्रशांत प्रिंदावनकर आणि सुधाकर वस्त यांनी एकामागून एक रंगतदार खेळांचे सादरीकरण करून खेळाडूंसोबतच प्रेक्षकांनादेखील या खेळांची भुरळ पाडली. या स्पर्धेच्या विजेत्या रंगावली संस्थेतील श्वेता सतिश कदम यांना पैठणी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आपला माणूस भूषण अनंत विचारे यांनी पैठणी, सोन्याची नथ, स्मार्ट घड्याळे आणि एअर पौडस्, तसेच सहभगी भगिनिंस पारितोषिके देवून मंडळास मोलाचे सहकार्य केले.

सत्यनारायण पूजा दिनी बाळ गोपलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यात १३६ स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धेत चुरस निर्माण केली. तसेच महिलांसाठी आयोजलेल्या पाककला स्पर्धेत देखील अनेक भगिनींनी भाग घेवून एकापेक्षा एक सरस पदार्थांची मेजवानी सादर केली. साई कुंज संस्थेतील सुजाता नाईक यांच्या ‘कडबू’ या पारंपरिक पदार्थाने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला. डी.जे.जग्गु यांच्या तालावर रास – गरब्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यात विविध वेशभूषा करून अबाल वृद्धांनी सहभाग घेवून आनंद व्यक्त केला.

उत्सव मंडळाच्या वतीने विभागात कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे असे राजेश सोरप अध्यक्ष व अमित पालांडे, चिटणीस यांनी सांगितले.

कार्यक्रमांची सांगता भूषण विचारे, निखिल गुढेकर, राजन निकम , दिनेश साळवी, सुधाकर कदम या व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करून करण्यात आली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राजेश सोरप, उपाध्यक्ष सुधाकर वस्त, चिटणीस अमित पालांडे, उपचिटणीस राहूल केदारी, खजिनदार सुनीत कदम, उपखजिनदार निलेश धावडे तसेच प्रशांत प्रिदांवनकर, हरीश सूर्यवंशी, राजेश सोनवणे प्रवीण सावंत, कुणाल विश्वकर्मा, विशाल पांड्या, राजू परब, चेतन चौलकर, डॉक्टर मकरंद गावडे, कमलाकर सक्रे या व इतर अनेक कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत प्रिदांवनकर यांनी केले. तसेच सर्व रहिवाशी, मान्यवर, हितचिंतक, देणगीदार यांच्ये आभार सुधाकर वस्त यांनी व्यक्त केले.

Mumbai Local: मुंबई पश्चिम उपनगरीय लोकलचे वेळापत्रक बदलले; नविन वेळापत्रक येथे डाऊनलोड करा

   Follow us on        

Mumbai Local: पाश्चिम उपनगरीय मार्गावरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक दिनांक 12 ऑक्टोबर पासून बदलण्यात आले आहे.

नवीन वेळापत्रकात १२ नव्या लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर ६ लोकल सेवांचा विस्तार करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने नवीन वेळापत्रकात अप दिशेने सहा आणि डाउन दिशेने सहा लोकल सेवांचा समावेश केला आहे.

अप दिशेने बोरिवली – चर्चगेट जलद लोकल बोरिवलीहून सकाळी १०.३६ वाजता चालविण्यात येत होती. ती लोकल आता भाईंदरहून सकाळी १०.२१ वाजता सुटेल आणि चर्चगेटला सकाळी ११.२४ वाजता पोहोचेल. विरार – अंधेरी जलद लोकल दादरपर्यंत विस्तारित केली आहे. ही गाडी विरारहून दुपारी ३.३६ वाजता सुटेल आणि दुपारी ४.४१ वाजता दादरला पोहोचेल. तर वसई रोड – चर्चगेट जलद लोकल विरारहून चालविण्यात येणार आहे. वसई रोडवरून रात्री ८.४१ वाजता सुटणारी चर्चगेट जलद वातानुकूलित लोकल आता विरारहून रात्री ८.२९ वाजता सुटेल आणि रात्री ९.५३ वाजता चर्चगेटला पोचणार आहे.

प्रवाशांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या १० जलद लोकलला १५ डब्यांत रूपांतरित केले आहे. अप मार्गावर १०.३९ वाजताची विरार – चर्चगेट, १०.४४ ची विरार – दादर लोकल, दुपारी १.१४ वाजता सुटणारी विरार – अंधेरी, दुपारी १.४२ वाजता सुटणारी विरार – चर्चगेट, दुपारी २.४८ वाजता सुटणारी विरार – बोरिवली या लोकल १५ डब्बा चालविण्यात येणार आहेत. तर डाउन दिशेने दुपारी १२.६ वाजता सुटणारी दादर – विरार लोकल, दुपारी १२.०९ वाजताची चर्चगेट – विरार, दुपारी २ वाजताची अंधेरी – विरार, दुपारी ३. १८ वाजता सुटणारी चर्चगेट – विरार, दुपारी ३. २३ वाजता सुटणारी बोरिवली – विरार जलद लोकल १५ डब्याची चालविण्यात येणार आहे.

नवीन १२ लोकल कोणत्या? 

अप दिशेने सकाळी ५.३२ वाजता अंधेरी – चर्चगेट धीमी लोकल, सकाळी ७ वाजताची डहाणू रोड – विरार धीमी लोकल, सकाळी १०.२५ वाजताची डहाणू रोड – विरार धीमी लोकल, सकाळी ११.३५ ची जलद विरार – चर्चगेट लोकल, दुपारी २. २८ ची गोरेगाव – चर्चगेट धीमी लोकल आणि रात्री ९.५८ वाजता बोरिवली – चर्चगेट धीमी लोकल चालविण्यात येणार आहे. तर डाऊन दिशेने सकाळी ४.५० वाजता विरार – डहाणू रोड दरम्यान धीमी लोकल, सकाळी ९.०७ वाजता चर्चगेट – गोरेगाव धीमी लोकल, ९.३० वाजता विरार – डहाणू रोड धीमी लोकल, दुपारी २. २३ वाजता चर्चगेट – गोरेगाव धीमी लोकल, रात्री ९.२७ वाजता चर्चगेट – अंधेरी धीमी लोकल, रात्री १०. ५ वाजता चर्चगेट – नालासोपारा जलद लोकल चालविण्यात येणार आहे.

बदललेले वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक क्लिक करा.

अप लोकल

https://kokanai.in/wp-content/uploads/2024/10/1728545484440-UP-AC-78-PTT-W.E.F.-12.10.2024.pdf

डाऊन लोकल

https://kokanai.in/wp-content/uploads/2024/10/1728545420850-DN-AC-PTT-78-W.E.F.-12.10.2024.pdf

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search