Category Archives: मुंबई

MMRDA to develop 446 villages: एमएमआरडीए करणार कोकणातील ४४६ गावांचा कायापालट

   Follow us on        
मुंबई: मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) चे जागतिक आर्थिक केंद्रात रूपांतर करण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने पहिले पाऊल उचलले आहे. हे सुरुवातीला MMR समाविष्ट असलेल्या मोठ्या ६,३५५ चौरस किलोमीटरमधील १,२५० चौरस किमीच्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून  या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ला विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून नियुक्त केले आहे.
या योजनेनुसार पालघर, वसई, पनवेल, खालापूर, पेण आणि अलिबाग या तालुक्यांतील ४४६ गावांवर एमएमआरडीए लक्ष केंद्रित करणार आहे. या क्षेत्रात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह मेट्रो कनेक्टिव्हिटी, चांगले रस्ते आणि पूल, नवीन सीवरेज आणि ड्रेनेज लाईन आणि रिअल इस्टेट विकासावरील नियमांसह सर्वसमावेशक पद्धतीने हे काम हाती घेतले जाणार आहे.
हा मेगा-प्लॅन महाराष्ट्र सरकारने एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्रात रुपांतरित करण्यासाठी तयार केला आहे ज्यात फिनटेक, रोबोटिक्स, एआय, आरोग्य, शिक्षण, जागतिक विमान वाहतूक सेवा आणि मनोरंजन यासारख्या सेवांवर लक्ष केंद्रित केले आहे. या आणि इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि पुढील सात वर्षांत या प्रदेशासाठी तीनशे डॉलर अब्ज GDP चे राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
MMR योजना आधीच सुरू असलेल्या आणि MMR सोबत संलग्न असलेल्या इतर मेगा-प्रोजेक्ट्ससह, वाढवण बंदर, पालघर येथील बुलेट ट्रेन स्टेशन, पनवेल-कर्जत सेक्शनवरील नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर, विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर, यासह इतर मेगा-प्रोजेक्ट्सचा समावेश करेल.
“आम्हाला अलीकडेच एक आदेश प्राप्त झाला आहे ज्यामध्ये MMRDA ला MMR मध्ये १,२५० चौरस किलोमीटरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) बनवण्यात आले आहे. रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील या क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांसाठी आम्ही एक समग्र योजना तयार करू,” असे एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
या ४४६ गावांपैकी २२३  गावे पालघर जिल्ह्यातील वसई आणि पालघर या तालुक्यांमध्ये येतील आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर या तालुक्यांमध्ये तेवढीच गावे येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एमएमआरडीएची सीमा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात आणि पूर्वेकडील पाताळगंगा नदीच्या दक्षिण भागात येईल. दक्षिणेला खालापूर, पेण, अलिबागपर्यंत हद्द वाढवण्यात आली आहे. त्यात पालघर जिल्ह्यातील अनेक गावेही जोडली गेली आहेत. एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जुलैमध्ये राज्य सरकारने एमएमआरचा आकार ४,३५५ चौरस किमीवरून ६,३५५ चौरस किमीपर्यंत वाढवला आहे.

Loading

सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म लांबीचे काम डिसेंबर अखेरपर्यंत लांबले; कोकण रेल्वे मार्गावरील ३ गाड्यांवर परिणाम

   Follow us on        
Konkan Railway News: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील क्रमांक ११ आणि १२ च्या प्लॅटफॉर्मच्या लांबीच्या विस्ताराचे काम अपूर्ण असून ते डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या  कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ३ गाड्या दादर आणि ठाणे स्थानकापर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत ‘शॉर्ट टर्मिनेट’ करण्यात येणार आहेत.  कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांचा प्रवास दादर आणि ठाणे या स्थानकांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.
गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसचा ३१/१२/२०२४ पर्यंतचा प्रवास ठाणे स्थानकावर मर्यादित Short Terminate करण्यात येणार आहे.
गाडी क्र. २२१२०  मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा ३१/१२/२०२४ पर्यंतचा प्रवास दादर स्थानकावर मर्यादित Short Terminate करण्यात येणार आहे.
गाडी क्र. १२०५२  मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसचा ३१/१२/२०२४ पर्यंतचा प्रवास दादर स्थानकावर संपविण्यात येणार आहे

Loading

कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि ईतर प्रश्नांसाठी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे या महत्वाच्या मागणीला वाचा फोडण्यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती – महाराष्ट्र तर्फे मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे संबधित प्रश्नांसाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. कोकण रेल्वेवरील स्थानकांचा संथगतीने होणारा विकास,

कोकण रेल्वेचे दुहेरीकरण, कोकण रेल्वेला थेट अर्थसंकल्पीय निधी मिळण्यात येणार्‍या अडचणी, कर्जात बुडत चाललेली कोकण रेल्वे आणि कोकण रेल्वेचे विलिनीकरण किती महत्वाचे या विषयांसाठी ही पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

ही पत्रकार परिषद मुंबई प्रेस क्लब, ग्लास हाऊस, आझाद मैदान, महापालिका मार्ग, मुंबई – ४०० ००१ येथे मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर  दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान पार पाडण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस सर्व कोकण प्रेमी प्रवासी आणि पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

 

Loading

Konkan Expressway: मुंबई ते गोवा प्रवास ६ तासांवर आणणारा ‘कोकण द्रुतगती महामार्ग’ नेमका कसा असणार?

   Follow us on        
Konkan Expressway: विद्यमान सरकारने देशातील सर्व शहरे महामार्गाने जोडण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता मुंबई आणि गोवा जोडणारा एक नवा महामार्ग म्हणून कोकण द्रुतगती महामार्ग Konkan Expressway  बांधण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. कोकण एक्सप्रेसवे (ME-6) हा पनवेल (नवी मुंबई) आणि सिंधुदुर्गला रायगड आणि रत्नागिरी मार्गे जोडणारा महाराष्ट्रातील मार्ग संरेखन असलेला प्रस्तावित 6 लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे.  या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एमएसआरडीसीने महामार्गासाठी पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महामार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पर्यावरण विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
एमएसआरडीमार्फत कोकण द्रुतगती द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हा द्रुतगती महामार्ग   375.94 किमी लांबीचा असून तो कोकणातून जाणार आहे. एकूण १७ तालुक्यामधून हा महामार्ग जाणार आहे. तर संपूर्ण मार्गावर १४ इंटरचेंज असणार आहेत. महामार्ग तयार करण्यासाठी एमएसआरडीसीला सुमारे ८७१  छोटे-मोठे पूल, बोगदे, एफओबी, व्हायाडक्ट, अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधा तयार कराव्या लागणार आहेत. कोकण द्रुतगती महामार्ग चार पॅकेजमध्ये तयार करण्याच्या आराखड्यावर काम सुरू आहे.
कोकण एक्स्प्रेसवेसाठी 68 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.  मुंबई ते गोवा अंतर 523 किमी आहे. कोकण एक्स्प्रेसवे  प्रकल्पासाठी सुमारे  3,792 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी सुमारे 146 हेक्टर जमीन वनविभागाची आहे.
मुंबई ते गोव्याला जोडणाऱ्या नवीन महामार्गामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या सहा तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या या प्रवासासाठी 12 ते 15 तास लागत आहेत.

रचना तपशील

  • छोटे पूल : ४९
  • प्रमुख पूल : २१
  • रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) : ३
  • वायडक्ट्स : ५१
  • बोगदे : ४१
  • वाहन ओव्हरपास (VOP) : ६८
  • वाहन अंडरपास (VUP) : ४५
  • इंटरचेंज : १४
  • टोल प्लाझा : १५
  • वेसाइड सुविधा : ८
Pic Credit- themetrorailguy

Loading

मुंबई आणि कोकण पट्ट्यात आज रात्री पाऊस धो धो बरसणार; हवामान खात्याचा धोक्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

   Follow us on        

IMD Alert: गेले दोन दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस हजेरी लावत आहे. तर काही ठिकाणी धो-धो पावस पडत आहे. यामुळे अनेक भागात पावसाने पिकांचे नुकसानही केले आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस  राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच आज दिनांक २५ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबई आणि कोकण पट्ट्यात हवामान खात्याने धोक्याचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून मंगळवारी (24 सप्टें.) गुजरा, राजस्थानच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून बाहेर पडला आहे. परतीच्या मान्सूनची सीमा फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माउंट अबु, दिसा, सुरेंद्रनगर, जुनागढ येथून जात आहे. मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मीती झाली आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात 27 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे.

 

Loading

आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेच्या वतीने मुंबई लोकल संदर्भात पश्चिम रेल्वेच्या डिआरएम यांच्याकडे विविध मागण्या

   Follow us on        

दिवसेंदिवस मुंबई लोकलमधील गर्दी वाढत असल्याने प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाला काही पर्याय सुचवले आहेत यामध्ये मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशाच्या एकूण करांपैकी २५% कर हा फक्त मुंबई शहर भरते तरीही दरदिवसाला मुंबई लोकल मधून पडून ५ ते ६ प्रवाशांचा बळी जातोय त्यामुळे सर्व लोकल सेफ्टी डोअरच्या चालवाव्यात,मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे,मध्य रेल्वे व हार्बर लाईन वर प्रवाशांच्या तुलनेत लोकल चालवण्यासाठी भुयारी मार्गाचा पावर करावा. ( उदा. बुलेट ट्रेन ) किंवा रेल्वे ब्रिज डबलिंगचा ( उदा. मेट्रो ) सारखा वापर करावा म्हणजे खालून जलद लोकल, मेल,एक्सप्रेस तर ब्रिजवरून स्लो लोकल चालवल्या जातील.याच्याने भविष्यात प्रवाशांच्या तुलनेत मुंबई लोकल चालवता येतील.

मुंबई आणि उपनगरांच्या दक्षिणेकडे मोठया प्रमाणात इंडस्ट्रीज तर उत्तरेच्या बाजूला मोठी रेसिडेंसी असल्याने मुंबई लोकलचा समतोल बिघडतोय,म्हणून सकाळी मुंबईच्या दिशेने तर संध्याकाळी मुंबईच्या बाहेर जाताना मोठी गर्दी दिसतेय,यासाठी पालघर,बोईसर, वसई,वाडा,भिवंडी,कल्याण,कर्जत व नवी मुंबई ह्या परिसरात मोठया इंडस्ट्रिज आहेत म्हणून येथे ट्रान्सपोर्ट हब बनवून येथे लोकल व मेट्रोचे प्रमाण वाढवल्यास सकाळी व संध्याकाळी अप आणि डाऊन मार्गावरील मुंबई लोकलच्या गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल,पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेच्या मुंबई लोकलचे स्वतंत्र्य झोन बनवावे,पश्चिम रेल्वे वरील गर्दी कमी करण्यासाठी सर्व लोकल १५ डब्यांच्या चालवाव्यात.

एसी लोकलसंदर्भात पश्चिम रेल्वेच्या नेहमीच्या लोकल रद्द करून त्या ठिकाणी एसी लोकल सुरू करू नयेत त्यासाठी नवीन वेळापत्रक बनवावे सर्वसामान्यांना एसी लोकल परवडत नसल्याने फक्त ३०%  प्रवासीच त्यातून प्रवास करतात परिणामी त्याचा मागील लोकल वर भार येऊन प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो लटकून प्रवास केल्याने लोकल अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे.

मुंबईच्या तिन्ही मार्गावरील एसी लोकलचा तिकीट दर कमी करावा विरार ते चर्चगेट दरम्यान एसी लोकलचा मासिक पास २२०० रू.आहे १२ ते १५ हजारावर काम करणाऱ्या मुंबईकरानी हे पैसे आणायचे कोठून? यासाठी १) सामान्य लोकल वाढवा किंवा ते शक्य नसल्यास २) त्या सर्व स्क्रॅप करून त्याबदल्यात सेफ्टी डोअरच्या एसी किंवा नॉनएसी लोकल सरसकट सेकंड क्लासच्या तिकीट दरांमध्ये चालवाव्यात किंवा ३) एसी चे तीन कोच सामान्य लोकलला जोडावेत, त्याच्याने जनरल,फर्स्ट क्लास व एसी एकत्रच धावतील.

विरार नालासोपारा प्रवाशांच्या समस्या यामध्ये नालासोपारा हे पश्चिम रेल्वेवरील सर्वात जास्त लोकवस्तीचे स्टेशन आहे सकाळी कामाच्या वेळी विरारला रिटर्न जाऊन वेळ फुकट जात असल्याने ७ ते १० या वेळेत प्रत्येक २० मिनिटांनी यशवंतनगर यार्ड मधून फ्रेश लोकल प्लॅटफॉर्म नंबर २ वरून नालासोपारा ते चर्चगेट /दादर /अंधेरी अशा लोकल सुरू कराव्यात.

पश्चिम रेल्वेच्या विरार चर्चगेट लोकलमध्ये नालासोपारावाले रिटर्न येऊन प्रवास करत असल्याने सकाळी ६.३० ते १० या वेळेत विरारला येणाऱ्या फास्ट ट्रॅक वरील सर्व लोकल नालासोपारा प्लॅटफॉर्म नंबर ३ वर न थांबवता त्या थेट वसई वरून विरारला आणाव्यात व नालासोपारा प्लॅटफॉर्म नंबर १ वरील सर्व लोकल नेहमीप्रमाणे थांबवाव्यात,विरार लोकल असूनही विरारकरांना अंधेरी बांद्रापर्यंत बसायलाच मिळत नाही ( उदा. संध्याकाळी सर्व फास्ट लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्याने थांबत नाहीत त्याप्रमाणे सकाळी नालासोपाऱ्याला करावे )

सकाळी ७ ते १० या गर्दीच्या वेळेत प्रत्येक २० मिनिटांनी विरारच्या नारंगी रोड व यशवंत नगर यार्ड येथील यार्ड मधून प्लॅटफॉर्म ६ व १ वरून विरार ते चर्चगेट /दादर / अंधेरी अशा फास्ट लोकल सुरू कराव्यात.

विरार अंधेरी लोकल संदर्भात सकाळी गर्दीच्या वेळी विरार चर्चगेट लोकल ह्या अंधेरीला ३०% खाली होतात त्यामुळे सकाळी ७ ते १० व सायं. ६ ते १० या वेळेत विरार अंधेरी दरम्यान प्रत्येक २० मिनिटांनी जलद लोकल चालवाव्या,संध्याकाळी गर्दीच्या वेळी  ७.२५ ते ८.१३  दरम्यान २ अंधेरी विरार लोकल सुरू कराव्यात मधील ५० मिनिट अंधेरी विरार लोकलच नाही आहेत.

इतर महत्वाच्या मागण्या पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल टर्मिनस येथील लीज संपल्याच्या कारणांनी विरारच्या यशवंतनगर यार्डची निर्मिती करण्यात आली. रेल्वेने त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही खर्च केला मात्र हे यार्ड नेहमी रात्रीच्या वेळी खाली असल्याचे निदर्शनास येत आहे,येथे स्टेला लोकलच नसतात,असे का? असा सवाल प्रवासी संघटनेने केला आहे.

विरार चर्चगेट विरार सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी लेडीज स्पेशल लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात,गर्दीच्या वेळी मुंबई लोकलमध्ये जेष्ठ नागरिकांना त्यांच्या सीट पर्यंत पोहोचताच येत नाही त्यासाठी त्यांना स्वतंत्र बोगी मिळावी.

काही मुंबई लोकलमध्ये सेकंड क्लासच्या डब्यातील बसण्याच्या सिटस अत्यंत वाईट आहे त्यावर प्रवाशांना १० मिनिटे बसताच येत नाही.

पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात काही बदल करावेत यामध्ये सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ६ ते १० यावेळी डहाणू रोड ते वसई रोड अशा प्रत्येक २० मिनिटांनी लोकल सुरू कराव्यात.रात्री ११ नंतरच्या बऱ्याच लोकल भाईंदरच्या यार्डमध्ये येत असल्याचे निदर्शनास येत आहे, त्यातील काही लोकल विरारच्या यार्ड मध्ये आणाव्यात. व विरारला सर्व एसी लोकल प्लॅटफॉर्म नंबर १ वरूनच चालवाव्यात.

पहाटे ३ वाजून ३० मि.पासून चर्चगेट विरार लोकल सुरू कराव्यात.दिवसभरात चर्चगेट बोरीवली फास्ट लोकलच्या काही फेऱ्या रद्द करून त्या ठिकाणी डहाणू रोडच्या लोकल फेऱ्या वाढवाव्यात.पहाटे ५.८ मिनिटांची नालासोपारा बांद्रे लोकल विरार वरून सुरू करावी.

रात्री ११.१२ मिनिटांची अंधेरी नालासोपारा लोकल अंधेरी विरार करावी.डहाणू रोड / बोईसर ते विरार लोकल सायंकाळी ७ च्या दरम्यान सुरू करावी.सकाळी ७.१८ मि.विरार दादर फास्ट लोकलला नालासोपाऱ्याला थांबा देऊन ती विरार चर्चगेट अशी चालवावी.

चर्चगेट विरार सायंकाळी ६.२२ मिनिटांची एसी फास्ट लोकल सामान्य लोकल म्हणून चालवावी.सकाळच्या ७.१९ आणि ८.२४ मिनिटांची विरार बोरीवली १५ डब्यांच्या स्लो लोकल अंधेरी पर्यंत चालवाव्यात. तर पुढे सकाळी ८ ते ९ दरम्याने ४ अंधेरी चर्चगेट स्लो लोकल आहेत त्यातील काही कमी कराव्यात.सायं. ६.५१ ते ८.४४ यांच्यामध्ये १ तास ५३ मिनिटात चर्चगेट विरार स्लो लोकल नाही आहेत तर दरम्यानच्या काळात ४ चर्चगेट ते विरार / भाईंदर स्लो लोकल चालवाव्यात.

सायंकाळी ६ नंतर प्रत्येक अर्ध्या तासाने दादर ते विरार लोकल चालवाव्यात.सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते १० दरम्यान विरार चर्चगेट विरार काही लोकल डबल फास्ट कराव्यात तर काहीना अल्टरनेट थांबे द्यावेत.डहाणू दिवा ते पनवेल मेमू प्रत्येक तासाला सोडावी किंवा त्या मार्गावर लोकल सुरू कराव्यात.

निवेदनावर अध्यक्ष श्री.अनिल मोरे व सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सहया केल्या असून त्याच्या प्रति रेल्वेमंत्री,राज्याचे मुंख्यमंत्री,जनरल मॅनेजर पश्चिम रेल्वे,मुंबईचे खासदार श्री.पियुष गोयल,श्री.हेमंत सावरा,श्री.अरविंद सावंत,सौ.वर्षा गायकवाड व स्टेशन मास्तर विरार,नालासोपारा व वसई रोड यांना देण्यात आल्या आहेत.

Loading

पश्चिम उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेकडून गोड बातमी; गर्दी विभागण्यासाठी अजून नव्या गाड्यां लवकरच रूळांवर

   Follow us on        

मुंबई : पाश्चिम उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान नवीन सहाव्या मार्गिकेच्या पूर्तीनंतर पाश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर नव्या १२ लोकल चालवण्यात येणार आहे. लोकलमधील प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी १२ डब्यांच्या १० लोकल फेऱ्यांचे रूपांतर १५ डब्यांत करण्यात येणार आहे. नवे वेळापत्रक लागू झाल्यावर प्रवाशांना या सुविधा वापरायला मिळतील.

पश्चिम रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेस आणि लोकल मार्गिकांच्या स्वतंत्र मार्गिका उभारण्यासाठी सहाव्या मार्गिकेचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू आहे. ऑक्टोबर अखेर सहावी मार्गिका कार्यरत होणे अपेक्षित आहे. यामुळे रेल्वेगाड्या चालवण्यासाठी अतिरिक्त रूळ उपलब्ध होणार आहे. दादर ते विरार दरम्यान नव्या १० लोकल फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. वाढीव फेऱ्यांनंतर पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांची संख्या १,४०६पर्यंत पोहोचणार आहे. त्याचबरोबर बारा डब्यांच्या १२ लोकल फेऱ्यांचे रूपांतर १५ डबा लोकलमध्ये करण्यात येणार आहे.पंधरा डब्यांच्या लोकल विस्तारामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेगाड्यांवर नवे वेळापत्रक लागू करण्यात येईल. वेळापत्रक अंमलबजावणीचीf तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, असे पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

Loading

Mumbai Local : वरिष्ठ नागरिकांचा त्रास वाचविण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय

   Follow us on        
मुंबई : उपनगरीय लोकलमध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा राखीव ठेवण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत.  लोकलमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाला पूर्णविराम देण्याच्या उद्देशाने लोकलमधील एका मालडब्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या स्वतंत्र डब्यात रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, त्याबाबतच्या कार्यादेशासाठी रेल्वे प्रशासनाकडून विलंब होत असल्याबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, हा कार्यादेश लवकरात लवकर काढण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईपर्यंत त्यांना मालडब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्याचे आदेशही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला दिले. त्यानंतर, दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईल, असे रेल्वे प्रशासनाने न्यायालयाला आश्वासित केले. त्यानंतर, न्यायालयाने या प्रकरणी दाखल याचिका निकाली काढली.
मध्य आणि पश्चिम उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक गाड्यांमध्ये काही जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, उपनगरीय लोकल गाड्यांमधील गर्दीचा विचार करता ज्येष्ठ नागरिकांना त्या जागांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या या त्रासावर उपाय म्हणून अपंग प्रवाशांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करण्याची मागणी वकील के. पी. पी. नायर यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे.
पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक यांनी या याचिकेवर उत्तर दाखल करताना, पश्चिम आणि मध्य रेल्वेने गेल्या वर्षी रेल्वे मंडळाला मालडब्यात (चर्चगेटच्या दिशेपासून लोकलच्या सातव्या डब्यात बदल करण्याची शिफारस केली होती. त्याचप्रमाणे, हा डबा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा विशेष डबा म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. रेल्वे मंडळाने व्यवहार्यता आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा अभ्यास केल्यानंतर यावर्षी २७ फेब्रुवारी रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
नायर यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी, याबाबतची माहिती न्यायालयाला देण्यात आली. तसेच, रेल्वे प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक उपाययोजना केल्या जात असून येत्या दोन वर्षात मध्य रेल्वेच्या १५५, तर पश्चिम रेल्वेवरील १०५ डब्यांचे ज्येष्ठ नागरिकांसाठींच्या स्वतंत्र डब्यात रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून खंडपीठाला देण्यात आली. मात्र, त्याबाबतचा कार्यादेश अद्याप काढण्यात आलेला नसल्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, हा कार्यादेश लवकरात लवकर काढण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.

Loading

‘नमो भारत रॅपिड रेल्वे’च्या तुलनेत कमी सुविधा असणाऱ्या मुंबई एसी लोकलचे भाडे दुप्पट का? मुंबईकरांचा प्रश्न

   Follow us on        
मुंबई: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुज आणि अहमदाबादला जोडणाऱ्या देशातील पहिल्या ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ ला हिरवा कंदील दाखविला आहे. ही गाडी सर्वच बाबतीत मुंबईतील एसी लोकलच्या बाबतीत सरस आहे. मात्र प्रवास भाड्याचा विचार केला तर मुंबई एसी लोकलचे प्रवास भाडे ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ च्या जवळपास दुप्पट आहे.
नमो भारत रॅपिड रेल्वे अनेक सुविधांच्या बाबतीत मुंबई एसी लोकल च्या पुढे आहे. या गाडीचा वेळ प्रति तास १३० किमी आहे. तर गाडीत मोबाईल चार्जिंग, एलईडी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्हीची देखरेख, अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आणि आरामदायक आसन व्यवस्थेत ही गाडी मुंबई एसी लोकलला मागे टाकत आहे. तर प्रवास भाड्याच्या बाबतीत मुंबई एसी लोकल पुढे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर मुबईतील एसी लोकल चे चर्चगेट ते विरार सिंगल प्रवास भाडे ११५ रुपये आहे, आणि महिन्याच्या पासचे शुल्क २२०५ रुपये आहे. तेवढ्याच अंतरासाठी  (५९ किलोमीटर) नमो भारत रॅपिड रेल्वेचे प्रवासभाडे अनुक्रमे ७० आणि १४१६ रुपये एवढे आहे.
याचा अर्थ मुंबईकरांना तुलनेने कमी सुविधा मिळणाऱ्या प्रवासासाठी जवळपास दुप्पट प्रवास भाडे भरावे लागत आहे. यामुळे मुंबईकर प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नमो भारत रॅपिड रेल्वे ही छोट्या छोट्या शहरांना जोडणार असल्याने तिचे प्रवासभाडे तेथील प्रवाशांना परवडणारे असणे आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन हे भाडे ठरविण्यात आले आहे. मुंबईतील लोकल गाड्यांच्या प्रवास भाड्यात MUTP शुल्क आणि इतर शुल्कांचा समावेश असल्याने तिकीटदर तुलनात्मक दृष्टीने जास्त असतात असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
येत्या काही महिन्यांत मुंबई मध्ये वसई – दिवा, पनवेल – डहाणू/वसई, मुंबई – पुणे, मुंबई – नाशिक हे मार्ग नमो भारत रॅपिड रेल्वे साठी प्रस्तावित आहेत.

Loading

‘भेदभाव’ केल्याबद्दल लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल

   Follow us on        

मुंबई :लालबागचा राजा गणेश मंडळ दर्शनादरम्यान व्हीआयपी आणि सामान्य भाविक यांच्यात भेदभाव करत असल्याचा आरोप करत, मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन वकिलांनी मुंबई पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या प्रसिद्ध मंडळामध्ये बाप्पांचे दर्शन घेताना, सामान्य लोक आणि व्हीआयपींना परस्परविरोधी वागणूक दिली जात असल्याचे दर्शवणारे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

व्हिडिओमध्ये, मंडळ कर्मचारी गणेशाचे दर्शन घेताना लगेचच भक्तांना जबरदस्तीने ओढून ढकलताना दिसत आहेत, तर दुसरीकडे व्हीआयपींचा एक वेगळा गट बाप्पांच्या समोर सेल्फी घेत आहे. या प्रकाराबद्दल आशिष राय आणि पंकज मिश्रा या वकिलांनी या असमान वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मंडळांच्या कर्मचाऱ्यांचा हा माजोरडेपणा सुरु आह्रे. या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती या दोन वकिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केली असून, त्यांच्या तक्रारीच्या प्रती राज्य महिला आयोग, राज्य मानवाधिकार आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाठवल्या आहेत.

आशिष राय म्हणाले, हे मंडळ जगप्रसिद्ध आहे. इथे चांगला पोलीस बंदोबस्त आहे, तरीही ही सुरक्षा व्हीआयपींपुरती मर्यादित आहे. सामान्य भाविकांना असे संरक्षण मिळत नाही. मंडळाच्या आर्थिक स्त्रोतांचा विचार करून, या असुरक्षित गटांना प्राधान्य दिले पाहिजे. भक्तांना तक्रारी नोंदवण्यासाठी घटनास्थळी तक्रार पेटी बसवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. राय यांच्या मते, मंडळामधील कर्मचारी अप्रशिक्षित आहेत आणि त्यांच्याकडे मूलभूत मानवी व्यवस्थापन कौशल्यांचा अभाव आहे. हा मुद्दा वर्षानुवर्षे कायम आहे, आणि व्हायरल व्हिडिओमुळेच समोर आला आहे. पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात याबाबत सुधारणा न झाल्यास हे प्रकरण न्यायालयात नेले जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search