गणेशोत्सवासाठी दोन दिवस धावणार ‘मोदी एक्सप्रेस’

 

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ आणि ११ सप्टेंबर रोजी विशेष ‘मोदी एक्सप्रेस’ ट्रेन धावणार आहे. गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान ्यांना गावाकडे घेऊन जाणाऱ्या या विशेष रेल्वेची यावर्षीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ही गाडी ९ आणि ११ सप्टेंबर रोजी दादर येथील फलाट क्रमांक १४ वरून सकाळी १०:३० वाजता कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे.

​मुंबईहून सुटणारी ही विशेष रेल्वे गाडी रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली आणि सावंतवाडी येथे पोहोचणार असून प्रवाशांसाठी प्रवासात खाण्यापिण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या गाडीच्या तिकीट बुकिंगसाठी २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित भाजप मंडल अध्यक्षाेशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री राणे यांनी केले आहे. यामध्ये कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील चाकरमान्यांनी भाजप मंडाध्यक्षांशी, तर रत्नागिरीतील प्रवाशांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

​गेल्या १४ वर्षांपासून ‘मोदी एक्सप्रेस’च्या माध्यमातून चाकरमान्यांना गावात पोहोचवत असताना प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान पाहून मनापासून आनंद होतो, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. यंदाही सर्व चाकरमानी नाчыत-गाजत आपल्या गावाकडे जाण्यासाठी ‘मोदी एक्सप्रेस’साठी पूर्णपणे सज्ज आहेत. त्यामुळे सर्वांनी आपली हक्काची मोदी एक्सप्रेस पकडावी आणि बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात गावाकडे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search