आंबोली-चौकुळच्या विकासाला १०६ कोटींच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेची बळकटी

   Follow us on        

सिंधुदुर्ग: आंबोली आणि चौकुळ या भागातील नैसर्गिक जैवविविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने, तिथे शाश्वत पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेंतर्गत १०६ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, या विषयावर दिल्लीत सकारात्मक चर्चा झाली असून, हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास या परिसराच्या पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यावरही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून, आंबोली, चौकुळ आणि गेळे परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींवर ‘वन नोंद’ आहे, त्या जमिनींचे वाटप आणि प्रत्यक्ष वहिवाट असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे प्रमुख ध्येय असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. याशिवाय, सार्वजनिक प्रवासासाठी लवकरच पाच नवीन एसटी बसेस सेवेत दाखल होतील आणि त्यांचे लोकार्पण लवकरात लवकर केले जाईल.

शक्तिपीठ महामार्गाबाबत भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, या मार्गाला आमचा कोणताही विरोध नाही, उलट महामार्गाची अलाईनमेंट बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत जेणेकरून मळगाव आणि चौकुळ परिसराला जोडता येईल. शासनाचा सांवतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण पाठिंबा असून, ताज हॉटेल समूहाशी झालेल्या सामंजस्य करारानुसार लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search