सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, ३ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) मार्फत पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधिष्ठित आणि संगणकीकृत पद्धतीने राबवली जाणार आहे.
Follow us onसिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने नव्याने मंजूष मिळालेल्या ६७ लिपिक जागांसाठी देशपातळीवरील नामांकित आणि विश्वासू संस्था असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) कडे या नवीन भरतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी बँक आपली भरती प्रक्रिया आयबीपीएस (IBPS) मार्फत पार पाडत असे आणि निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देऊन ती प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली होती. आता नव्या टप्प्यात टीसीएससोबत अधिकृत करार करून पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जात आहे, ज्याचे वेळापत्रक अधिकृतपणे निश्चित झाले आहे.
बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक उमेदवारांना ३ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत असणार आहे, तर या भरतीसाठीची संगणकाधारित परीक्षा १८ ऑक्टोबर २०२६ च्या दरम्यान घेतली जाईल. टीसीएसला विविध बँका, वित्तीय संस्था आणि शासकीय उपक्रमांच्या परीक्षा आयोजित करण्याचा मोठा अनुभव असल्याने ही परीक्षा अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
ग्राहकांना उत्तम आणि आधुनिक बँकिंग सुविधा देण्याच्या उद्देशाने तसेच वाढत्या व्यावसायिक विस्ताराला गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेकडून ही भरती मोहीम हाती घेण्यात आली आहे. बँकेच्या शाखांमधील कामकाजात अधिक कार्यक्षमता यावी आणि ग्राहकोपयोगी सेवा अधिक परिणामकारक ठराव्यात, यासाठी लिपिक वर्गाची ही पदे महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गसह परिसरातील नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र तरुणांसाठी ही एक उत्तम व सुवर्णसंधी मानली जात आहे.
या संपूर्ण भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात, पदांसाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रम यांसारख्या सर्व महत्त्वपूर्ण अटी-शर्ती लवकरच बँकेच्या www.sindhudurgdcc.bank.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या जाणार आहेत. उमेदवारांनी १ सप्टेंबर २०२६ नंतर बँकेची ही वेबसाईट नियमितपणे तपाजत राहावी, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची सूचना किंवा अद्ययावत माहिती हुकणार नाही आणि वेळेत अर्ज करता येईल.
बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्ह्यातील तमाम पात्र व इच्छुक उमेदवारांना आवाहन केले आहे की, त्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि निश्चित केलेल्या मुदतीत आपले ऑनलाइन अर्ज सादर करावेत. सर्व प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारावर होणार असल्याने उमेदवारांनी कोणतीही गैरसमजुती न बाळगता केवळ आपल्या अभ्यास व योग्य तयारीवर भर देऊन या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे सांगण्यात आले आहे.


