नव्याने जाहीर झालेली मुंबई – सावंतवाडी एक्सप्रेस मुंबईहून रात्री सोडण्याची मागणी

   Follow us on        

मुंबई: भारतीय रेल्वेने कोकणवासीयांना मोठा दिलासा देत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड दरम्यान नव्या ‘दैनिक एक्स्प्रेस’ला मंजुरी दिली आहे. मुंबई आणि कोकणचे अतूट समीकरण लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने ५१० किलोमीटरच्या या अंतरासाठी नवीन गाडी दररोज चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवासासाठी गाडी क्रमांक १५०८७ आणि परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच सावंतवाडी रोड ते सीएसएमटीसाठी गाडी क्रमांक १५०۸८ निश्चित करण्यात आली आहे. दररोज धावणाऱ्या या गाडीमुळे तिकीट आरक्षणाचा ताण कमी होणार असून प्रवाशांचे नियोजन अधिक सोपे होणार आहे.

“वेळापत्रक रात्रीचेच असावे!”

सध्या कोकण मार्गावर धावणाऱ्या मांडवी एक्स्प्रेस आणि दिवा-सावंतवाडी यांसारख्या बहुतांश गाड्या दिवसाच्या आहेत. कोकणकन्या आणि तुतारी या मोजक्याच गाड्या रात्री धावत असल्या, तरी त्या कायम ‘फुल’ असतात आणि कोकणकन्याला सर्वच ठिकाणी थांबेही नाहीत. याउलट, दिवसाच्या प्रवासामुळे नोकरदार आणि कामधंद्यानिमित्त मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांचे जाण्या-येण्यातच रजेचे दोन महत्त्वाचे दिवस फुकट जातात.

वेळेची आणि रजेची मोठी बचत होणार

या नव्या दैनिक एक्स्प्रेसला खऱ्या अर्थाने प्रवाशांचा लाभ मिळायचा असेल, तर तिचे वेळापत्रक निश्चित करताना ती मुंबईतून रात्री ९ वाजता सोडण्यात यावी, अशी आग्रही आणि जोरदार मागणी आता कोकणी चाकरमान्यांकडून सोशल मीडियावर होऊ लागली आहे. रात्रीच्या वेळी ही गाडी सुटल्यास चाकरमानी आपापले काम संपवून थेट गावी पोहोचू शकतील, ज्यामुळे त्यांच्या बहुमूल्य वेळेची आणि रजेची मोठी बचत होणार आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search