खेड, संगमेश्वरला थांबे; सावंतवाडीच्या पदरी मात्र उपेक्षाच

 

सिंधुदुर्ग | सागर तळवडेकर :रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना काही थांबे प्रायोगिक तत्त्वावर मंजूर केले आहेत. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील खेड स्थानकावर मंगला तसेच एलटीटी कोचुवली एक्सप्रेसला तर संगमेश्वरवासियांची दीर्घ काळ मागणी असलेल्या नेत्रावती एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर केला आहे, या मधे सावंतवाडीकरांची मागणी असलेली मंगला,मंगलोर,वंदे भारत,नागपूर – मडगाव,मत्स्यगंधा,नेत्रावती आणि कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या त्रिवेंद्रम राजधानी आणि गरीब रथ एक्सप्रेस संदर्भात काहीच निर्णय झाले नसल्याचे उघड झाले आहे.एकंदरीत सावंतवाडीकरांचा मागण्यांना केराची टोपली दाखवली असेच दिसते.

कोकण रेल्वेच्या संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी चिपळूण संगमेश्वर फेसबुक समूहा च्या माध्यमातून संगमेश्वरवासियांना सोबत घेऊन पत्रकार संदेश जिमन यांनी वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. संगमेश्वरवासियांच्या या दीर्घ लढ्याला अखेर यश आले आहे. रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध मार्गांवरील गाड्यांना जे काही प्रायोगिक थांबे दिले आहेत त्यात संगमेश्वरवासियांच्या नेत्रावती एक्सप्रेसला थांबा देण्याच्या मागणीचाही समावेश झाला आहे.

याचबरोबर मुंबई ते मडगाव या मार्गावर अलीकडेच वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मिळालेल्या खेड स्थानकाला रेल्वेने आणखी एक भेट दिली आहे. एर्नाकुलम -हजरत निजामुद्दीन मार्गावर धावणारी मंगला एक्सप्रेस तसेच एलटीटी ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला खेड थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर खेडवासीयांना आणखीन दोन गाड्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे या साठी जल फाउंडेशच्या अक्षय महापदी यांनी विशेष प्रयत्न केले होते.

रेल्वे बोर्डाने त्या त्या झोनला पाठवलेल्या पत्रात प्रायोगिक थांबा मंजूर केलेल्या गाड्यांना नवीन थांब्यावर थांबवण्याची अंमलबजावणी त्या त्या ठिकाणच्या सोयीनुसार शक्य तितक्या लवकर करण्याबाबत सूचित केले आहे.

सावंतवाडीकरांच्या पदरी मात्र उपेक्षाच.

अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न आणि प्रवासी संख्या असूनही सावंतवाडीकरांवर अन्याय सुरूच आहे. पहिल्यांदा झीरो टाईम टेबलच कारण देऊन त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस आणि एलटीटी कोचुवेली गरीबरथ एक्सप्रेसचे थांबे काढून घेण्यात आले, त्यानंतर नागपूर मडगाव या स्पेशल गाडीचा थांबा देखील या स्थानकातून काढून घेण्यात आला.या स्थानकात दोन महिन्यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा देखील नाकारण्यात आला होता, येथील टर्मिनसच काम देखील ठप्प आहे, या सर्व बाबींवर अलीकडेच काही प्रवासी संघटनांनी देखील पाठपुरावा केला होता परंतु रेल्वे बोर्डाने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत असेच चित्र येथे पाहायला मिळते. या स्थानकात स्वर्गीय डी के सावंत यांचा पुढाकाराने मंगला आणि मंगलोर एक्सप्रेसला थांबा कोकण रेल्वे चे संचालक श्री गुप्ता यांनी तत्वतः मान्य केला होता, तसेच येथे वंदे भारत, नेत्रावती, मत्स्यगंधा, नागपूर मडगाव, मंगलोर, मंगला या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून सर्वजण प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी आवश्यक पाठपुरावा देखील सुरू आहे परंतु प्रवासी आणि प्रवासी संघटनांची उदासीनता देखील या थांब्याना येथे मंजुरी न मिळणे कारणभूत असू शकते असेच दिसते.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search