काजू बोंड संदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे एमडी व टीम भारतात येणार आहेत. येथील काजूची ते पहाणी करणार असून त्यानंतर काजू बोंडावर प्रकिया सुरु केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळणार आहे. काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल असा विश्वास माजी मंत्री, सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे ते आज बोलत होते.
2 लाख हेक्टर जमिनीवर काजूची लागवड होते. यातील काजू गरावर प्रक्रिया होते. मात्र, काजू बोंड फुकट जात. 3 हजार 200 कोटीचे काजू बोंड वाया जाते. ब्राझिल देशात यावर विशेष संशोधन झाले असून या बोंडापासून विविध प्रकारची पेये, काजूचा जूस, मिट आदिंसारखे पदार्थ बनवले जातात, असे केसरकर म्हणाले.
तसेच ब्राझील येथे भारतील गाईंचे संवर्धन केले आहे. यामध्ये संकरीत जाती देखील करण्यात आल्या आहेत. आपल्याकडील कोकण कपिला गाईंच्या दुग्ध उत्पादन वाढ व्हावी यादृष्टीने देखील यावेळी चर्चा झाली. त्या पद्धतीचे तंत्रज्ञान प्राप्त झाल्यानंतर व दुग्ध उत्पादन वाढ झाल्यावर कोकण कपिलाचा एटू मिल्क म्हणून वापर करता येईल असे केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्युझिकल फाऊंटन उभा राहत आहे. महिला, युवक यांच्यासाठी सिंधुरत्न योजनेतून पर्यटन प्रकल्प साकार होत आहेत. हाऊस बोटच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे. तसेच ताज गृपच्या माध्यमातून माय बंगलो सारखा उपक्रम राबविण्यात येणार असुन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पर्यटनासाठीच्या मिनी बसेसचा शुभारंभ लवकरच होणार आहे अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
Facebook Comments Box