मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; वाहनांना धडक देऊन ट्रक विहिरीत कोसळला

   Follow us on        

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरात आज पहाटे एक भीषण अपघात घडला. स्टीलने भरलेल्या एका भरधाव मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने त्याने महामार्गावरील चार वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक दिल्यानंतर हा ट्रक थेट रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत कोसळला. या अपघातात ट्रकचा चालक ट्रकखालीच दबला गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, अद्याप त्याच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

​घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर ग्रामीण पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. या अपघातात इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, सुदैवाने इतर कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या परिसरात वारंवार अपघात होत असूनही प्रशासनाकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याने स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search